राज्यातील DPC व TC यांचे दोन टप्प्यात विशेष प्रशिक्षण पूर्ण

मूल्यवर्धन प्रशिक्षणात सहभागी झालेले DPC व TC 
(दिनांक : २९ ऑक्टोबर २०२५)

‘मूल्यवर्धन’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांना करणार सहाय्य

‘मूल्यवर्धन ३.०’ अंतर्गत राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणानंतर या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता शिक्षकांना सहाय्य करण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांनी नियुक्त केलेल्या राज्यातील जिल्हा व तालुका समन्वयकांचे (DPC TC) पाच दिवसीय विशेष प्रशिक्षण दोन टप्प्यात यशस्वीपणे पूर्ण झाले.

पहिला टप्पा – १३ ते १७ ऑक्टोबर

१. चंद्रपूर- सहभागी जिल्हे: नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि वर्धा

२. अमरावती- सहभागी जिल्हे: वाशीम, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि बुलढाणा

३. पुणे- सहभागी जिल्हे: मुंबई, सांगली, रायगड, पालघर, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि नांदेड

दुसरा टप्पा – २७ ते ३१ ऑक्टोबर

१. बीड- सहभागी जिल्हे: बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि लातूर

२. नाशिक- सहभागी जिल्हे: नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि छ. संभाजीनगर

३. पुणे- सहभागी जिल्हे: धाराशिव, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणे

पहिल्या टप्प्यात पुणे- ११०, चंद्रपूर- ६०, अमरावती- ५५, तर दुसर्‍या टप्प्यात नाशिक- ६०, बीड- ५० आणि पुणे- ७५ DPC TC यांनी यशस्वीपणे प्रशिक्षण घेतले. विशेष म्हणजे पाच दिवसांच्या या प्रशिक्षणात त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सक्रिय सहभाग होता.

या प्रशिक्षणाचा उद्देश म्हणजे ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रमाचे उद्दिष्ट, टप्पे आणि मार्च २०२६ पर्यंतची ध्येये समजून घेणे, तसेच अहवाल प्रणाली अधिक मजबूत करणे, शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय वाढविणे आणि तालुका व जिल्हास्तरावरील नियोजन व आढावा यंत्रणा प्रभावीपणे राबविणे जेणेकरुन शिक्षक ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रमाची अंमलबजावणी वर्ग पातळीवर प्रभावीपणे करू शकतील, हा आहे.

पुणे येथील दुसर्‍या टप्प्यातील प्रशिक्षणास एसएमएफचे कार्यकारी संचालक व्ही. वेंकटरमना आणि एसएमएमएफचे मार्गदर्शक श्री. विद्याधर शुक्ल यांनी टीमला मार्गदर्शन केले. तसेच राज्यभरातील सर्व शाळांमध्ये ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रम परिणामकारकपणे राबविला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.