Banner

मूल्यवर्धन: विद्यार्थ्यांना संवेदनशील व मूल्याधिष्ठित नागरीकत्वाचे धडे!

मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या एका उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी
(दिनांक : २ डिसेंबर २०२५)
२०१५ पासून राज्यातील शासकीय शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू आहे. या वर्षीपासून शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवी या वर्गांसाठी हा कार्यक्रम नव्याने सुरू झालेला आहे. मूल्यवर्धन शिक्षक तथा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र शंकर लाड (विद्या मंदिर वालूर, केंद्र वारूळ, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी आपली भूमिका सदरील लेखातून मांडलेली आहे.

महाराष्ट्रात तब्बल १,९३,३७० शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण पूर्ण

केज येथील मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षणात सहभागी झालेले बीड जिल्ह्यातील शिक्षक
डिसेंबरमध्ये सर्व शाळांमध्ये होणार ‘मूल्यवर्धन’ची अंमलबजावणी
(दिनांक : २५ नोव्हेंबर २०२५)
महाराष्ट्रातल्या ३४ जिल्ह्यांतील ३५३ तालुक्यांमध्ये शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत १,९३,३७० शिक्षकांनी सदरील प्रशिक्षण पूर्ण केले असून या शिक्षकांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.

मूल्यवर्धनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष शाळा भेटींना सुरुवात

ZPPS शाळा, श्रीरामपूर येथे प्रत्यक्ष वर्गनिरीक्षण करताना मूल्यवर्धनचे तज्ज्ञ प्रतिनिधी
(दिनांक : १२ नोव्हेंबर २०२५)
‘मूल्यवर्धन ३.०’ अंतर्गत राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणानंतर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांना सहाय्य करण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांनी नियुक्त केलेल्या राज्यातील जिल्हा व तालुका समन्वयकांचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. या प्रशिक्षणानंतर कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रत्यक्ष शाळा पातळीवर सुरू झाली आहे.

राज्यातील DPC व TC यांचे दोन टप्प्यात विशेष प्रशिक्षण पूर्ण

मूल्यवर्धन प्रशिक्षणात सहभागी झालेले DPC व TC 
(दिनांक : २९ ऑक्टोबर २०२५)

‘मूल्यवर्धन’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांना करणार सहाय्य

‘मूल्यवर्धन ३.०’ अंतर्गत राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणानंतर या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता शिक्षकांना सहाय्य करण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांनी नियुक्त केलेल्या राज्यातील जिल्हा व तालुका समन्वयकांचे (DPC TC) पाच दिवसीय विशेष प्रशिक्षण दोन टप्प्यात यशस्वीपणे पूर्ण झाले.

राज्यात ‘मूल्यवर्धन’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टीम सज्ज!

पुणे: जिल्हा व तालुका समन्वयकांसह मूल्यवर्धन टीम
(दिनांक : २९ ऑक्टोबर २०२५)

DPC व TC यांचे विशेष प्रशिक्षण अंतिम टप्प्यात...

‘मूल्यवर्धन ३.०’ अंतर्गत राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणानंतर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता शिक्षकांना सहाय्य करण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांनी नियुक्त केलेल्या राज्यातील जिल्हा व तालुका समन्वयकांचे पाच दिवसीय प्रशिक्षण दोन टप्प्यात आयोजित केले आहे.

‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षणाचा प्रेरणादायी अनुभव!

नांदेड जिल्हा मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षणात सहभागी झालेले शिक्षक
(दिनांक : १५ ऑक्टोबर २०२५)

नुकतेच
नांदेड येथे जिल्हास्तरीय
मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झालेले साहेबराव शेळके (मुख्याध्यापक, स्वामी रामानंद तीर्थ प्रा.शा., नवा मोठा, त्रिरत्ननगर-सांगवी, नांदेड) यांनी या मूल्यवर्धन प्रशिक्षणासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

७० हजार शिक्षकांच्या ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षणाचा टप्पा पार!

पालघर जिल्ह्यातील तालुकास्तरीय प्रशिक्षण केंद्र, कोटबी बहुजडापा केंद्रातील सहभागी शिक्षक!
(दिनांक : १३ ऑक्टोबर २०२५)


 

शासनाच्या शिक्षण विभागाची शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घटना 
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT), जिल्हा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर शिक्षकांचे तालुकास्तरीय ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण युद्धपातळीवर सुरू आहे.

शिक्षक हेच मूल्यवर्धनचे खरे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’!

मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल शिक्षिका गायत्री सुभाष पाटील यांनी मत व्यक्त केले आहे...
(दिनांक : १० ऑक्टोबर २०२५)

मूल्यवर्धनचे
जुने प्रेरक किंवा शिक्षक भेटले, की या कार्यक्रमाविषयी ते तळमळीनं बोलतात. तेव्हा जाणवतं, की मूल्यवर्धनचं हेच खरं यश आहे! जि. प. प्राथमिक शाळा भोजे (केंद्र पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील शिक्षिका सौ. गायत्री सुभाष पाटील यांनी असाच प्रेरणादायी अनुभव शब्दबद्ध केला आहे.