Banner

मूल्यवर्धन उपक्रमातून बहुलतावादाची पायाभरणी

बहुलतावादाची संकल्पना आणि ‘मूल्यवर्धन’ उपक्रमातील त्याचे शैक्षणिक महत्त्व

महाराष्ट्र, (दिनांक: १६ फेब्रुवारी २०२६)

प्रस्तावना :

शिक्षणातून बहुलतावादाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये कशी रुजवता येतील आणि ‘मूल्यवर्धन’ उपक्रम या प्रक्रियेला कसे बळ देतात, याचा सखोल वेध या लेखात घेतला आहे. शालेय स्तरावर विविधतेचा स्वीकार, सहिष्णुता आणि परस्पर आदरभाव विकसित करण्यासाठी उपक्रमाधारित शिक्षणाची भूमिका येथे स्पष्ट केली आहे. एससीईआरटी, पुणे या संस्थेचे सेवानिवृत्त उपसंचालक श्री. विद्याधर शुक्ल यांनी बहुलतावादाची संकल्पना आणि ‘मूल्यवर्धन’ उपक्रमातील त्याचे शैक्षणिक महत्त्व सोप्या उदाहरणांसह मांडले आहे.

बेलदारवाडी शाळेतील शिक्षकाची ‘मूल्यवर्धन फाईल’ ठरतेय कौतुकास्पद!

बेलदारवाडीचे (जि. सांगली) शिक्षक राजाराम काटवटे यांची मूल्यवर्धन फाईल
महाराष्ट्र, (दिनांक: ९ फेब्रुवारी २०२६)

‘बेलदारवाडी’हीसांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात डोंगराळ भागात एक छोटी वाडी आहे. येथे पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेतील मूल्यवर्धन शिक्षक राजाराम काटवटे यांनी ‘मूल्यवर्धन फाईल’तयार केली आहे. सदरील फाइलमध्ये सन २०२५-२०२६ वर्षासाठी मूल्यवर्धन तासिकेत कोणते कोणते उपक्रम घेतले याची तपशीलवार नोंद ठेवतात. त्यावर वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची सही असते. तसेच शेरा द्यायचा असल्यास त्यासाठीही एक स्वतंत्र कॉलम सोडलेला आहे.

‘मूल्यवर्धन ३.०’ पायाभूत मूल्यांकन सर्वेक्षणास अभूतपूर्व प्रतिसाद; ३५ जिल्ह्यांतल्या ४६४ शाळांमध्ये SMF तर्फे झाले सर्वेक्षण

शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आयोजित मूल्यवर्धन ३.० पायाभूत मूल्यांकन सर्वेक्षणातील काही क्षणचित्रे
महाराष्ट्र, (दिनांक: ५ फेब्रुवारी २०२६)

राज्यातल्या शाळांमध्ये सुरू असलेल्या मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावी, व्यापक व्हावी तसेच दीर्घकालीन परिणाम मूल्यांकनाची पायाभरणी करण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रात महत्त्वाकांक्षी राज्यव्यापी पायाभूत मूल्यांकन सर्वेक्षणाचा एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. ३५ जिल्हे व ५८ तालुक्यातल्या मराठी व उर्दू माध्यमांच्या ४६४ शाळांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणास सहभागी सर्वच घटकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

‘तक्रार पेटी’च ‘कौतुक पेटी’ होते तेव्हा... मूल्यवर्धन कार्यक्रम प्रशिक्षणानंतर झालेला बदल…

तक्रार व कौतुक पेटीत सूचना टाकताना शाळेतला विद्यार्थी
महाराष्ट्र, (दिनांक: २३ जानेवारी २०२६)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्डीले वस्ती, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर या शाळेत शिक्षकांनी केलेल्या एका उपक्रमाची चर्चा आणि कौतुक होत आहे. त्यांनी एक ‘तक्रार’ व ‘कौतुक’ पेटी तयार करून ती पेटी शाळेत बसविली आहे. जे विद्यार्थी आपल्या काही सूचना, तक्रारी शिक्षकांना सांगू शकत नसतील, तर ते स्वत: चिठ्ठी लिहून या पेटीत टाकतात.

गप्पा मारूया, सारे शिकूया!

वर्गातील सहयोगी शिक्षणाचा एक प्रसंग (AI Photo)
महाराष्ट्र : (दिनांक : ८ जानेवारी २०२६)

प्रस्तावना :  मूल्यवर्धन उपक्रमांतील सहयोगी अध्ययन पद्धतींनुसार मुले गटात काम करता करता कितीतरी लोकशाही मूल्ये सहजपणे रुजू शकतात. याची जाणीव शिक्षक बंधु-भगिनींना, शालेय व्यवस्थापन समितीला कशी करून देता येईल याची दिशा या लेखात मिळेल. एससीईआरटी, पुणे या संस्थेचे सेवानिवृत्त उपसंचालक श्री. विद्याधर शुक्ल यांनी ही सहयोगी अध्ययन प्रक्रिया उलगडण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणाचा एक काल्पनिक प्रसंग वापरला आहे. 

मूल्यधिष्टीत शिक्षणातून घडणारी ‘संवेदनशील’ पिढी!

मूल्यवर्धन- जि.प.प्रा.शाळा, कलमठ- गावडेवाडीचे विद्यार्थी
महाराष्ट्र : (दिनांक : ५ जानेवारी २०२६)

मूल्यधिष्ठित शिक्षणातून मुलांच्या मनात करुणा, सहवेदना आणि माणुसकी कशी रुजते, याचा हृदयस्पर्शी अनुभव सहशिक्षिका सौ. रश्मी रामचंद्र आंगणे यांनी आपल्या शब्दांत मांडला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कलमठ गावडेवाडी (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील त्यांच्या वर्गातील हा छोटासा प्रसंग मूल्यवर्धन कार्यक्रमाचे सामर्थ्य उलगडून दाखवतो.

जबाबदारीची रुजवण करणारा प्रभावी उपक्रम : ‘वर्ग नियम’

विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले वर्ग नियम
महाराष्ट्र : (दिनांक : २९ डिसेंबर २०२५)

मूल्यवर्धन अंतर्गत
वर्ग नियम बनवणे हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यासाठी वर्गात तयार केले जाणारे सकारात्मक व कृतीयुक्त नियम हे शिक्षक व विद्यार्थी मिळून निश्चित करतात आणि पाळतात. यामुळे अध्ययन–अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी होते तसेच विद्यार्थ्यांमध्ये नकळत मूल्यांची जाणीव निर्माण होते.

कृष्णाने स्वतःबद्दल लिहिली सुंदर कविता; शिक्षक-पालकांकडून झाले कौतुक

जि. प. शाळा, झेंडेवाडी येथील विद्यार्थाने लिहिलेली सुंदर कविता

महाराष्ट्र : (दिनांक : १७ डिसेंबर २०२५)

मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्व-जाणीव, आत्मविश्वास आणि विचार करण्याची क्षमता विकसित होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमातून तिसरीच्या विद्यार्थ्याच्या कवितेतून हे प्रभावीपणे समोर आले आहे. मग त्याचे शिक्षक-पालकांकडून खूप खूप कौतुक झाले.